वैशालीची आम्रपाली : नगरवधु ते अरहंत
- Get link
- X
- Other Apps
©2014 By www.buddhistsofindia.blogspot.in You may copy anything else from this Blogspot, But : 1. You should mention the source of an article or text from where you copied it. 2. Don't use any article to make money in any respect . otherwise All Rights resereved
▼
सोमवार, १३ जानेवारी, २०१४
वैशालीची आम्रपाली : नगरवधु ते अरहंत
आम्रपाली हि बुद्धाची समकालीन होती. तिचा जन्मानंतर ती वैशालीच्या आम्रवनातील एका आंब्याच्या झाडाखाली सापडली यावरुनच तिचे नाव आम्रपाली असे पडले. महानाम नावाच्या पहारेकऱ्याने आम्रपालीचे पालन पोषण केले.
आम्रपाली लहानपणापासुनच सौंदर्यवान होती.
जसे जसे तिचे वय वाढत गेले तसे तसे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत गेली. तिचे ते असामान्य सौंदर्य, लावण्य, भुरळ लावणारी मादकता, या सर्वांनी संपुर्ण वैशाली शहराला मोहीनी लावली होती. वैशाली हे लिच्छवींच्या राजधानीचे शहर होते.
आम्रपाली केवळ अकरा वर्षाचीच असताना राष्ट्रातील सर्वात सुंदर स्त्री असे घोषीत करण्यात आले होते. तिच्या सौंदर्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण होते. सौंदर्य, साहस, तेज इत्यादी गुणांचा तिच्यात समन्वय होता. वैशालीचे राजकुमार तिच्यावर मोहित झाले होते. सर्वच्या सर्वच तिच्याशी लग्न करण्यास उत्सुक होती. वैशालीच्या कायद्यानुरार ती कोणाशीही लग्न करु शकत नव्हती. त्यामुळे तिला 'वैशालीची नगरवधू' घोषीत करण्यात आले. या घोषणेचा तिने खुप विरोध केला, त्याचा धिक्कार केला.....
भगवान बुद्धांसोबत भेट....
एकदा भगवान बुद्ध वैशाली मध्ये विहार करीत आहेत, हे वर्तमान कळताच ती भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला जेवनाचे आमंत्रण दिले आणि तथागतांनी ते स्वीकारले. हे ऐकुन ती आनंदाने तिथुन निघुन गेली वाटेत तिला लिच्छवी भेटले. त्यांनी आम्रपालीला याबद्दल विचारले असता ति म्हणाली, 'उद्या माझ्याकडे भगवान बुद्ध भिक्खुसंघा सोबत जेवन करण्यासाठी येत आहेत. हे ऐकुन राजकुमारांना सुद्धा आश्चर्य वाटले. ते म्हणाले, भगवंताचा भोजनाचा कार्यक्रम तुझ्या ऐवजी आमच्याकडे ठेव त्याच्या बदल्यात मी तुला एक लाह सुवर्ण मुद्रा देतो.
त्यावर आम्रपाली म्हणाली., हे आर्यपुत्रांनो..! तुम्ही मला या मोबदल्यात पुर्ण वैशालीचे राज्य दिले तरी या जेवनाचे यजमानपद मी तुम्हाला देणार नाही... यावरुन आम्रपालीची श्रद्धा दिसुन येते.
या मंगल प्रसंगी धम्मदेशना करताना भगवान म्हणाले,, सर्व प्राणिमात्रां विषयी मैत्री भाव ठेवणे, करूणेची भावना ठेवणे व जगातील सर्व प्राण्यांप्रती समता बाळगणे हाच खरा धर्म आहे....
भगवान बुद्धांनी आम्रपालीला अनित्यवादाचा उपदेश देताना सांगीतले,, हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौति व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.
या बहुमोल उपदेशाचा आम्रपालीच्या मनावर अतिशय खोलवर परीणाम झाला व तिच्या मनात भगवंताच्या धम्माविषयी खुप श्रद्धा निर्माण झाली व तिने त्यांच्या हस्ते परिव्रज्या धारण केली व ती भिक्खुणी संघात सामील झाली....
तिने आत्मचिंतन केल्यावर तिला समजले कि, आपले सौंदर्य, लावण, तारुण्य हे अस्थाई आहे, माझे शरीर दुर्गंधीचे केंद्र आहे. हे सौंदर्य नश्वर आहे, ते नष्ट होऊन वार्धक्य येणार आहे व शेवटी हे शरीर नष्ट होणार आहे...
या अनित्याच्या मुद्यावर ती थेरीगाथे मध्ये लिहिते... मी (पियुष खोब्रागडे) भाषांतरीत केलेल्या आम्रपालीच्या गाथा पुढीलप्रमाणे :
१. माझे केस काळे होते, अगदी मधमाशांच्या रंगाप्रमाणे, टोकावरुन निमुळते असे माझे केस वयानुसार तंतु देणाऱ्या वनस्पती प्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
२. आल्हाददायक, सुवासीक फुलांनी भरलेल्या टोपलीतुन वयानुसार (कालांतराने त्यामधुन) प्राण्यांच्या अंगावरील लोकरीप्रमाणे दुर्गंध येऊ लागला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
३. घनदाट आणि समृद्ध अशी वृक्षवाटिका, भव्य आणि उत्कृष्ट योजनेनी आखलेली अगदी मधाच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे ; वयानुसार (कालांतराने) असमृद्ध आणि विरळ बनला परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
४. सोन्याच्या दागिन्यांनी अलंकार करुन उत्कृष्ट दागिन्यांनी सजविलेली वेणी, वयानुसार तेथे टक्कल पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
५. अगदी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे उत्कृष्ट अशा माझ्या भुवया अतिशय सुंदर होत्या. वयानुसार त्या खचक्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
६. तेजस्वी, उज्वल आणि प्रखर रत्नाप्रमाणे माझे डोळे होते, वयानुसार ते तेजस्वी राहिले नाही ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
७. नाजुक शिखराप्रमाणे माझे नाजुक नाक अतिशय सुंदर आणि युवांमध्ये उत्कृष्ट होते. वयानुसार ते लांब मिरीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
८. अतिशय लोकप्रिय आणि अद्ययावत पद्धतीच्क्षा कंगणाप्रमाणे माझे कान अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते खाली खचले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
९. कळ्यांच्या शुभ्र रंगाप्रमाणे माझे दात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते पिवळसर पडले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
१०. घनदाट अरण्यातील कोकीळ पक्ष्याप्रमाणे माझ्या आवाजाचा स्वर होतो, वयानुसार तो बिघडला ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदलले नाही.
११. गुळगुळीत - शंखाप्रमाणे निर्दोष अशी माझी मान उत्कृष्ट होती, वयानुसार ती भ्रष्ट झाली ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१२. दरवाज्याच्या गोलाकार दांड्याप्रामाणे माझ्या दोन्ही भूजा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार त्या पाटली वृक्षाप्रमाणे वाळल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१३. सोन्याच्या अलंकाराने सजवलेले आणि अंगठी घातलेले माझे नाजुक हात अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते कांद्याप्रमाणे बनले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१४. विस्तारलेले, गोलाकार, टणक, कणखर आणि उंच असे माझे दोन्ही स्तन एकेकाळी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, म्हातारपणाच्या अनावृष्टीमुळे रिकाम्या अशा जुन्या पाण्याच्या पिशव्याप्रमाणे लटकत आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१५. सोन्याच्या पत्र्याप्रमाणे असे (तेजस्वी) चकचकीत, सुंदर आणि उत्कृष्ट असे माझे शरीर, वयानुसार सुरकुत्यांनी झाकाळले गेले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१६. हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत मऊ व गुळगुळीत अशा माझ्या दोन्ही मांड्या अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होत्या, वयानुसार ते वेळूप्रमाणे झाले आहेत ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१७. सोन्याच्या अलंकाराने सजविलेले, सोन्याची साखळी घातलेले माझे नाजुक सांध अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार ते शिसमच्या काडीप्रमाणे झाले ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही.
१८. जणुकाही मऊ कापसाने बनलेल्याप्रमाणे माझी पाय अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होते, वयानुसार त्यात शुष्क होऊन भेगा पडल्या ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....
१९. असे हे शरीर प्रत्यक्ष कचऱ्याचे ढीग होते :
घराच्या (शरीराच्या) बरगड्या मोडल्या आहेत, छप्पर नष्ट झाले आहे ; परंतु सत्याच्या शिक्षकाने बोललेले सत्य बदललेले नाही....
भगवान बुद्धांच्या धर्मावर श्रद्धा ठेऊन त्यानुसार आचरण केल्यामुळे आम्रपाली बुद्धांच्या धर्मात आणि बौद्ध इतिहासात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले... नगरवधू पासुन तिने अरहंतपद प्राप्त करुन घेतले...
![]() |
| सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा... |
See Also :
→ रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...
→ भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)
→ मराठी धम्मपद
→ नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....
- Get link
- X
- Other Apps

Khup Chan............
उत्तर द्या