कालाम सुत्ताचे चुकीचे भाषांतर
- Get link
- X
- Other Apps
©2014 By www.buddhistsofindia.blogspot.in You may copy anything else from this Blogspot, But : 1. You should mention the source of an article or text from where you copied it. 2. Don't use any article to make money in any respect . otherwise All Rights resereved
▼
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४
कालाम सुत्ताचे चुकीचे भाषांतर
Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I have said it, unless it agrees with your own reason and your own common sense.
आजकाल इंटरनेटच्या माध्यमातुन या इंग्रजी सुभाषीताचा बुद्धवचन म्हणुन प्रचार होताना दिसत आहे. परंतु हे खरे बुद्धवचन नाही आहे. तर मुळ पाली गाथेचे चुकीचे भाषांतर करण्यात आले आहे.
या इंग्रजी सुभाषीताचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो. कोणी सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका, पवित्र धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका., मी स्वतः सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. तुमच्या बुद्धीलापटत असेल तरच त्यावर विश्वास ठेवा. (जो खऱ्या वचनापेक्षा अगदी वेगळा आणि चुकीचा आहे)
या सुभाषिताचे मुळ आपल्याला अंगुत्तर निकायाच्या तिक्कनिपातातील 65 व्या कालाम सुत्ता मध्ये सापडते. जर आपण कालाम सुत्त बरोबर वाचले तर आपल्याला खरा समजुन येईल.
भगवान बुद्धांची कल्याणकारी शिकवण देशाच्या शहरा-शहरात, गावा-गावात एखाद्या झंजावाताप्रमणे पसरु लागली होती. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी देशोदेशीचे श्रमण आणि ब्राह्मण त्यांच्याजवळ येत होते. असेच एकदा भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या गावाला गेले असता, त्या गावातील कालामांनी भगवान बुद्धांना योग्य तो उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले...
‘एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ।
१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....
तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.
हा या गाथांचा खरा अनुवाद आहे. यामधील चौथा मुद्दा आहे कि कोणती गोष्ट तर्कसंगत आहे, आमच्या बुद्धीला पटते म्हणुन ती गोष्ट स्वीकारु नका, त्या गोष्टीवर विश्वास ठेवु नका. तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी वाईट, ज्या मार्गावर चालल्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल त्यानुसार आचरण करा आणि त्याचाच स्वीकारा... असे भगवान बुद्ध आपल्याला उपदेश करतात.
जर तर्कच सर्वश्रेष्ठ असता तर भगवानांना उपदेश करण्याची आवश्यकता काय असती...?
कारण प्रत्येक गोष्ट तर्कावर सुटु शकत नाही. आणि सत्यही तर्काच्या बळावर गवसणार नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या बुद्धीचे लोक राहत असतात जर प्रत्येक जण आपआपल्या तर्कावरच विश्वास ठेवायला गेला तर जगातुन सत्य नाहीसे होईल. अंधविश्वासही वाढेल..
चांगल्या मानवकांचे तर्क चांगले तर वाईट माणवकांचे तर्क वाईटच असतील. परंतु सत्यापेक्षा ते वेगळेच असेल. ज्याचे त्याचे तर्क ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसारच असतील शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे कि सामान्य मानवाचे इंद्रिय हे मर्यादीत असतात. प्रत्येक गोष्ट ते त्याच्या तर्कावर सोडवु शकणार नाहीत.
उदा. मानवाचे कान अल्ट्रासोनीक साऊंड ऐकु शकत नाहीत., तसेच कित्येक सुक्ष्म जीव आपल्या डोळ्याने तो पाहु शकत नाही, हे सर्व मानवाच्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत..
या सर्वांपेक्षाही बुद्धाचा धर्म सहावा इंद्रिय मानतो, ते म्हणजे आपले मन.... सामान्य मानवाच्या मनाचीही शक्ती इतर इंद्रियांप्रमाणे मर्यादीत आहे...त्यामुळे केवळ तर्कावर तो सत्याचा शोध लावु शकणार नाही.
परंतु त्यासाठी (मनाची शक्ती वाढविण्यासाठी) एक मार्ग सांगीतला आहे. त्याने असा कुठेही दावा केला नाही कि त्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे. परंतु त्याचा हा धम्ममार्ग एकमेव मध्यम मार्ग आहे एवढे मात्र नक्की.
बुद्ध हे मानवाचेच विकसीत रुप आहे., मानवाच्या मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्धत्व होय.
भगवान गौतम बुद्धांनी जे काही सांगीतले ते सर्वकाही स्वतःच्या अनुभवातुन, (तर्कावरुन नव्हे.!) आणि त्यांचा असा दावा आहे कि कोणीही हा सिद्धांत स्वतः अनुभवुन पाहु शकतो....
![]() |
| सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा... |
→ आम्हाला फेसबुकवर Follow करा
- Get link
- X
- Other Apps


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा